Sunday, April 24, 2016

जैविक खते - शैलजा तिवले

जैविक खते

जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक जैविक गुणधर्मांची वाढ होण्यास जमिनीतीलच सूक्ष्म जीवजीवाणूंचा उपयोग करून तयार करण्यात आलेली जैविक खते मदत करतात. वनस्पतींच्या पेशींची वाढ आणि गुणन ही प्रमुख कार्ये नत्रामुळे होत असतात. हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणा-या जीवाणूंची  प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जैविक/जिवाणू खते असे म्हणतात.
जैविक खतांचे वर्गीकरण-

नत्र स्थिर करणारे जीवाणू
रायझोबियम: हे जीवाणू पिकांच्या मूळावर गाठी स्वरूपात राहून हवेतील नत्र शोषून घेवून पिकांना पुरवितात. परंतु निरनिराळ्या पीकासाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम जिवाणूचे खत वापरावे लागते .काही महत्त्वाचे पीकांचे गट पुढे दिले आहेत.
पीके - जीवाणू खत
सोयाबीन – (रायझोबियम) जापोनिकम, (रायझोबियम) इटलाय, (रायझोबियम) फ्रिडाई
वाटाणा - (रायझोबियम) लग्युमिनोसायरम
हरभरा - (रायझोबियम)  सिसीराय चवळी, मुग, तूर, मटकी इ. - (रायझोबियम) जीवाणूचा प्रकार
बरसीम - (रायझोबियम)  ट्रायफेली फ्रेंच बीन / बीन -(रायझोबियम) फँझिओलाय
अँझोटोबॅक्टर: हे जीवाणू जमिनीमध्ये वनस्पतीच्या मुळाच्या भोवती राहून नायट्रोजन द्रव्याच्या साहाय्याने हवेतील नत्र अमोनिआच्या स्वरुपात पिकांना उपलब्ध करुन दिला जातो. हे जीवाणू नत्रस्थिरीकरण करण्याबरोबरच जिब्रेलीक अँसीड, व्हिटॅमीन आणि इंडॉल अँसीटीक अँसीड यांसारखी संप्रेरके जमिनीत सोडतात. त्याचा फायदा उगवण आणि पिकाची झपाटयाने वाढ होण्यासाठी होतो.
अँझोस्पिरीलम: हे जीवाणू जमिनीमध्ये वनस्पतींच्या मूळांवर त्याचप्रमाणे मूळांमध्ये असतात तसेच या जीवाणूमूळे मात्र गाठी तयार होत नाही. एकदल पिकांची पेरणी करताना या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला, ऊस, फळझाडे या पिकांसाठी या खताचा वापर केला जातो.
बायजेंरीकीया: हे जीवाणू 6.5 सामूपेक्षा कमी असलेल्या जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचे कार्य प्रभावीपणे करु शकतात त्यामुळे कोकणात याचा जास्त वापर केला जातो.

नत्र स्थिर करणार्‍या सूक्ष्म वनस्पती

अँझोला: ही पाण्यावर तंरगणारी वनस्पती असून भात खाचरामध्ये वाढताना पिकाला कोणताही त्रास न देता तणाचा नाश करते.
निळे-हिरवे शेवाळ: शेवाळे कार्बोदके तयार करत असताना पाण्यामध्ये प्राणवायू सोडतात आणि हाच प्राणवायू भाताच्या रोपांनी घेतला तर त्यांची वाढ होते.
स्फुरद विरघळणारे जीवाणू: निसर्गात काही जीवाणू असे आहेत की जे अविद्राव्य स्थितीत असणा-या स्फूरदांवर प्रक्रिया करतात . ह्या प्रक्रियेत सुक्ष्म जीवाणू उदा. बँसिलस, सुडोमोनेस, पेनीसीलीयम, इत्यादी विशिष्ट प्रकारच्या आम्लांची निर्मिती करतात, ज्यामुळे अविद्राव्य स्फुरदाचे विघटन होऊन स्फुरद पिकांना उपलब्ध होतो. हे जिवाणू खत वापरल्य़ाने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सेंद्रिय पदार्थ कुजणारे जीवाणू- बुरशी, अँक्टीनोमायसीटस
सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करुन देणारे जीवाणू

- शैलजा तिवले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.