MIDAS प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती

MIDAS प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती हा विषय प्राधान्याने घेतला जातो. आर्थिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत मिडास प्रकल्पातील समूह विकास परियोजनेत खालीलप्रमाणे निवडप्रक्रिया सुरू आहे. 

कामाचा तपशील 
  • शेतकऱ्यांची दैनंदिनी बनवणे, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेणे.
  • शेतकऱ्यांची वैयक्तिक, शेती, आणि सामाजिक प्रोफाइल बनवणे. 
  • गावस्तरावर शेतीमाल उत्पन्नाचे अंदाज बांधणे. शेतमाल काढणीचे वेळापत्रक बनवणे. 
  • शेतकऱ्यांचे शेतमाल काढणी पासून शेतमालचे विक्री किंमत शेतकऱ्यांचे खातेवर येईपर्यंत पाठपुरावा करणे. 
  • मिडास प्रकल्पाची लोकवर्गणी जमा करून घेणे. 
  • ऐनवेळी उपस्थित प्रश्न सोडवणे. 

प्राधान्यक्रम 
  • उमेदवार शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील असावा.  
  • उमेदवाराचे वय १८ ते ३० वयोगटाचे असावेत. 
  • दिव्यांग उमेदवार - ३०% राखीव 
  • महिला - ३०% राखीव 
  • एकल पालक कुटुंबातील उमेदवार ३०% राखीव 
  • कृषि, अभियांत्रिकी, समाज सेवा, कॉमर्स पदवीधर 
कामाचे ठिकाण आणि उपलब्ध जागा 
  • नाशिक - ४ 
  • अहमदनगर - ४ 
  • पुणे - ४ 
  • मुंबई - ४ 
  • सातारा - २ 
  • कोल्हापुर - २ 
  • सांगली - ४ 
इतर नियम, अटी व शर्ती 
  • कोणत्याही प्रकारचा कागद वापरू नये. अपवादात्मक परिस्थितीत पुर्वमंजुरी घेवून वापरता येतात. 
  • शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकास हा प्राधान्याचा विषय असलेने संस्थेमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही अधिकृत कर्मचारी यांना सुट्टी लागू नाही. 
  • मासिक ४ सुट्टी लागू आहेत. 
  • मिळणारे भत्ते हे उमेदवारांनी भविष्याच्या नियोजनानुसार वापरावेत, संस्था कोणाचीही जबाबदारी घेत नाहीत. उदा. वैद्यकीय भत्ता हा इन्शुरन्स साठी वापरावा. अपघात परिस्थितीत संस्था मदत करत नाही. 
  • अपेक्षित उमेदवार प्राप्त न झालेस वरील प्राधान्यक्रम बदलनेचे अधिकार संस्थेकडे आहेत.